🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यात लागू करावे अशी मागणी केली आहे. तर भूतकाळातील एका घटनेचीही आठवण करून दिली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.
I reminded CM Uddhav Thackeray that since long BJP Shivsena fighting against the Bangladeshi Ghushkhor of Shivajinagar, Govandi, Chandivali Mumbai, Mira Bhayandar Navi Mumbai of Thane. Parliament passed CAB now initiate action against infiltrators @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/kVP1ooLrij
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 14, 2019
हे वादग्रस्त विधेयक राबवण्यास काही राज्यांनी नकार दर्शवला आहे. तर महाराष्ट्रातही हे विधेयक राबवले जाणार नाही, असे विधान कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी केले आहे. यावर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की, शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, मुबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे या घुसखोरी बांगलादेशींवर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
दरम्यान मोदी सरकारने मंजूर करून घेतलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू न करण्याचा निर्णय भाजपविरोधी सरकारे असलेल्या राज्यांनी घेतला आहे. पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल यांनी तसे जाहीरच केले आहे, तर काँग्रेसचे श्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याची आम्ही अंमलबजावणी करू, असे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र याबाबत कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205748230085955585?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205744474661376003?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205741834384752641?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
