Share

“जे आपल्या उमेदवारांवर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?”

Published On: 

मुंबई : भूतकाळातील घडामोडींपासून धडा घेत गोवा काँग्रेसने शनिवारी(२२ जाने.) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना मंदिर,दर्गा आणि चर्चमध्ये दर्शनासाठी नेले. तसेच येथे उमेदवारांना निवडणूक जिंकल्यानंतर पक्ष सोडणार नाही, अशी शपथ देण्यात आली. २०१७ पासून आत्तापर्यंत १७ पैकी १५ आमदार काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळेच कदाचित भूतकाळाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्या ३६ उमेदवारांना महालक्ष्मी मंदिर, बांबोलीम क्रॉस आणि बेटिन मशीद येथे नेले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’गोव्यात कॉँग्रेसने उमेदवारांना चर्च, मंदिर, दर्गा येथे नेऊन निवडून आल्यावर न फुटण्याची शपथ दिली, म्हणजेच गोवा काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही ते फुटणार याची खात्री असावी म्हणून ही धडपड? जे आपल्या उमेदवारावर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?’, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान, धार्मिक स्थळांवर नेऊन उमेदवारांना शपथ दिल्यानंतर काँग्रेसने म्हंटले आहे की,’काँग्रेसला मिळालेले मत म्हणजे भाजपला मिळालेले मत असा आभास निर्माण होत असल्याने सर्व उमेदवारांनी शपथ घेतली.’ काही दिवसांपूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि AITC (ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस) चे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला मतदान करण्यासारखेच आहे, अशी टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!