Share

Jitendra Awhad | “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून…”, वेदांता प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता ग्रुप व फॉक्स कॉन चा सेमीकंडक्टर चीफ निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करून खजिना महाराष्ट्रात आणला होता आणि आत्ताचे राज्यातील शासक इथे होऊ घातलेल्या एवढा मोठा प्रोजेक्ट आणि महसूल गुजरातला देऊन आले, फरक स्पष्ट व्हावा, एवढाच शुद्ध हेतू अशा शब्दात आव्हाड यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

पाहा ट्विटः

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन हा 1.54 लाख कोटी गुंतवणूक असलेला उद्योग अचानक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते.

सर्वात महत्वाचा मानला जाणार हा प्रकल्प गुजरातला गेला कसा याबाबत एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. त्यावेळी या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते लाईफ सायन्स 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!