Share

शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवत गीता वाचली आहे का? : जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाविद्यालयात भगवत गीता देण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा असा सल्ला देखील पाटील यांनी तावडे यांना दिला आहे.

नॅकचे A आणि A+ चे नामांकन असलेल्या मुंबईतील महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करावेत असा आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. उच्च शिक्षित असलेल्या तावडे यांना आणि त्यांच्या सरकार हिंदुत्ववादी धोरण राबवायचे आहे ते यावरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. या वादग्रस्त निर्णयावर जयंत पाटील यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवदगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे.

पाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

दरम्यान जर धर्माचा प्रसार करायचाच असेल तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत अशी उपरोधात्मक मागणी आ.कपिल पाटील यांनी केली आहे. ‘जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत होत नव्हतं, पण आता इथेही सुरु होतंय असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

यूपीएससीचे नियम बदलणार?

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!