Share

‘बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरु आहे. मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर का झाले मग. पक्षातील इतर लोकांना पुढे का नाही केलं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या सुरात सुर मिसळला.

‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मीच त्यांचा हात हातात घेतला आणि वर केला. आणि सांगितलं की, हेच मुख्यमंत्री होणार’, असं शरद पवार म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यावर टीका केली. शरद पवारांच्या वक्तव्यावरुन आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आता ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री व्हायची त्यांना इच्छा नव्हती, मीच त्यांना मुख्यमंत्री व्हायचा आग्रह केल. सदैव भावी…बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो, असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!