Share

मुख्यमंत्री पद आणि कॅबिनेट मंत्री पद देखील अहोरात्र मेहनत करणाऱ्यांनाच मिळते का?- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेना आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसल्याच्या बातम्या बघायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray)यांनी शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं असे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला. परंतु यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बहुधा मुख्यमंत्री पद आणि कॅबिनेट मंत्री पद देखील असेच अहोरात्र मेहनत करणाऱ्यांनाच मिळते का?’, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.

दरम्यान, विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं’,असे आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!