Share

‘आज वसूली चालू है या बंद?’, अमृता फडणवीस यांचा सरकारला खोचक सवाल

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद येत आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारच्या या बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बंदवर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस ट्विट करत म्हणाल्या, ‘कोणी मला सांगेल का?, आज वसूली चालू है या बंद?’ असा  खोचक सवाल करत त्यांनी महाराष्ट्र बंदला आपला विरोध दर्शवला आहे.

तर दुसरीकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याच विषयावर भाष्य करत राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी ‘राज्यातल्या धोरणांबाबत ढिम्म’ सरकार, दुसऱ्याच्या नावावर राजकारण साधायला पुढाकार’ असलेलं महाराष्ट्र सरकार. बलात्कार अत्याचार घटनांनी रोज महाराष्ट्र हादरून जातोय,अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय. महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो… #NoMaharashtraBandh असं म्हणत वाघ यांनी शरसंधान केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!