मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.
राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नाही. 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी आहे. यापार्श्वभूमीवर मराठा समनव्यक बैठकीमध्ये मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान दिलं आहे.
मेटेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. मराठा समाज ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या कामावर नाखुश आहे. सोनिया गांधी यांनी दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहतात. तसा पुढाकार मराठा समाजासाठी का घेतला जात नाही, असा सवाल विनायक मेटे यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेमिंग ! नव्यावर्षात गुगल स्टॅडिया प्रो लाँच करणार ४ नवीन गेम
- रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका, तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त
- कोविड परिस्थितीमुळे राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय
- गौतम गंभीर यांच्या ‘जन रसोई’त मिळणार १ रुपयात पोटभर जेवण
- मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याच्या निर्णयावरून श्वेता महालेंची राज्य सरकार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
