🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन काळातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पकडून अँटिजेन तपासणी करत आहेत. नियुक्त पथकांनी शुक्रवारी (दि. ७) दिवसभरात १०१ जणांची कोरोना चाचणी केली. त्यात 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना कोविड सेंटरवर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहरात दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण निघत आहेत. शहरातील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून जाहिर केले आहेत. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. कुठलेही योग्य कारण नसतांना संचारबंदीतही अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून आले. त्यामुळे आता नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील चौकाचौकांमध्ये बेजबाबदारांना पकडून मोबाईल व्हॅनमध्ये कोरोना तपासणी करण्यात येत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हॅनची नजर असणार आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेजबाबदार नागरिकांविरोधात हे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विशाल पट्टेकर, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोडे, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन राबवित आहेत. शुक्रवारी दिवसभरात १०१ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात 2 नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब, बार मालकांसाठी पत्र लिहिलं तसंच शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा’
- गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करा, लग्न समारंभात गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या- जिल्हाधिकारी
- संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे : बाळासाहेब थोरात
- राजकारण्यांनो आता तरी सुधरा, हे नसते उद्योग बंद करा! ‘घोडेले’ प्रकरणावर लोकांनी व्यक्त केला संताप
- ‘ते’ आरोप चुकीचे नाहीत; मविआमध्ये काँग्रेसला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे – पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
