यासर्व प्रकरणावर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया आलेली आहे. संगमनेर हे शहर थोरात यांचे मानले जाते. ते म्हणाले कि, ‘संगमनेरमध्ये गस्त घालत असणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला करून त्यांना जखमी केले या घटनेबाबत बोलताना थोरात म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून प्रशासन आणि पोलीस नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांना चांगले जीवन मिळावे या साठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यात पोलिसांवर हल्ला होणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अशी घटना घडायलाच नको होती या मताचे आपण आहोत. पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेमध्ये जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करून दोषींवर नक्कीच कायदेशीर कारवाई करतील’ असे थोरात यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या जमावाने सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. यावेळी पोलिसाला मारहाण देखील करण्यात आली. पोलिसांनी ६ जणांसह अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमध्ये जमावाकडून अशाप्रकारचं कृत्य घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ते’ आरोप चुकीचे नाहीत; मविआमध्ये काँग्रेसला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे – पटोले
- वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्राने राज्यांना दिले ९ हजार ८७१ कोटी, मात्र, महाराष्ट्राचा समावेश नाही
- महाविकास आघाडीत मानापमान नाट्य; काँग्रेस आमदारानेच केले अनिल परबांवर गंभीर आरोप
- ‘मोदींमुळे भारतीय कोरोना त्सुनामीच्या विळख्यात’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्ष पदाची माळ प्रशांत जगतापांच्या गळ्यात !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
