Share

असं तसं मरण्यापेक्षा मग खाऊन पिऊन मरा, उदयनराजेंचा हटके सल्ला !

Published On: 

सातारा : भारत-चीन म्हणजे पूर्वीसारखं लढायचं युद्ध नाही. मुर्ख कुठले. हा सगळा बटणावरचा खेळ आहे. कोणीतरी सांगतं कोरोना चिकनमधून होतो, कोणीतरी उद्या मटणामधून होतो म्हणेल, कोणीतरी म्हणेल भाजीमधून होतो. मग काय खायचंच नाही का?. असं तसं मरण्यापेक्षा मग खाऊन पिऊन मरा असा हटके सल्ला भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

गांधी कुटुंबाला त्रास देणे योग्य नाही, निवासस्थान काढून घेणे दुर्देवी – थोरात

भारत-चीन तणाव म्हणजे येड्याचा बाजार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. कोरोनामुळे मृत्यू वाढत असल्याबाबत लक्ष वेधलं असता जन्माला येणार तो मरणारच, मरायचंच आहे तर खाऊन मरा, असा सल्ला उदयनराजेंनी दिला आहे. लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची मागणी उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली आहे.

महाराष्ट्रात किती कोरोना चाचण्या झाल्या? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती

‘लॉकडाऊन उठलं पाहिजे. किती दिवस तुम्ही लॉकडाऊन ठेवणार? आज इंटस्ट्री बंद आहेत. लोकांना रोजगार नाही. उपासमारीची वेळ आली आहे. सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे, हा विषय नसतोच. हे जर केलं नाही तर त्याचं जे नुकसान होणार आहे, ते याच्यापेक्षा जास्त होणार आहे, आधीच मोठं नुकसान झालं आहे. किती दिवस तुम्ही लोकांना थांबवणार आहात,’ असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!