मुंबई : गेले १०० दिवस कोरोनाने भारतासह जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना हि जागतिक महामारी असून ५ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारत हा अधिक लोकसंख्या व दाटीवाटीचा देश असल्याने या रोगाचा प्रभाव हा भयंकर असू शकतो असे सातत्याने वर्तविले जात आहे.
हे अन्यायकारक वीजबिल सरकारने माफ करावे – हर्षवर्धन पाटील
महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात या राज्यात जवळजवळ देशाच्या अर्ध्याहून जास्त रुग्णांची संख्या आढळून आली आहे. राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन हा रोग स्थानिक पातळीवर आटोक्यात आणण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे. आज महाराष्ट्राने सुमारे १० लाख कोरोना चाचणीचा टप्पा पार केल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.
महाराष्ट्राने आज १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केला. आपण 'चेस द व्हायरस' करत असताना ट्रेस, टेस्ट, ट्रीट हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवत आहोत. pic.twitter.com/7QQA5wHzfL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2020
महाविकास आघाडीत बिघाडी ?, कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांवर नाराजी
महाराष्ट्रात बुधवारी जी करोनाग्रस्तांची संख्या समोर आली त्यानुसार ४ हजार ३३७ जण करोना बाधित होते तर बुधवारी २२४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १ लाख ८० हजार २९८ इतकी झाली आहे. ज्यापैकी ९३ हजार १५४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

