🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून सैन्य दलाच्या कामगिरीचा फायदा उठवण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसत आहे. भाजपकडून आपल्या सत्ता काळात सर्जिकल स्ट्राईक केल्याचं सांगत प्रचार केला जात आहे. तर आता काँग्रेसने देखील युपीए सत्ताकाळात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखांवरून भाजपने कॉंग्रेसवर पलटवार करायला सुरुवात केली आहे.
काँग्रेसच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दाव्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी लष्करी अधिकारी राज्यवर्धन राठोड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सैन्यात तर मी होतो, आम्हाला माहित नाही हे कधी झालं. सर्व सैन्य आज भाजपसोबत आहे, त्यांचा पाठिंबा असाच नाही मिळालाय, कारण आम्हाला माहित आहे तिथे काय होतं अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसचा दावा खोडून काढला आहे.
Union Minister RS Rathore on Congress says 6 surgical strikes were conducted in our tenure: Fauj mein toh hum the na, hume pata hai na kya hua kya nahi hua. Saari sena aaj Bharatiya Janta Party Modi ji ke saath khadi hai, aise hi nahi khadi huyi,hum jaante hain wahan kya hota tha pic.twitter.com/kViwXSnsr6
— ANI (@ANI) May 2, 2019
दरम्यान, गुरुवारी पत्रकार परिषद घेवून यूपीए सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला होता आणि त्यांच्या तारखाही जाहीर केल्या होत्या.
कधी झाले काँग्रेसच्या सत्ताकाळात सर्जिकल स्ट्राईक
१ ) 19 जानेवारी 2008,
२ ) 30 ऑगस्ट- 1 सप्टेंबर,
३ ) 6 जानेवारी 2013,
४ ) 27-28 जुलै 2013,
५ ) 6 ऑगस्ट 2013
६ ) 23 डिसेंबर 2013
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

