औरंगाबाद : अखिल भारतीय तैलीक साहू महासभेच्या वतीने तेली समाजातील काही मागास जातींचा समावेश अतीमागास प्रवर्गामध्ये करण्याची मागणी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. महासभेच्या मराठवाडा विभाग पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. या निमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उत्तरप्रदेश मधील काही मोजक्या जातींनाच ओबीसी आरक्षणाचा लाभ होतो. आपल्याकडे राज्यातही अशा अनेक जाती आहेत. त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने न्या. रोहिणी आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगामध्ये सर्वांना समान आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी तीन टप्प्यात आरक्षणाची विभागणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात राज्यातील काही मागास जातींचा समावेश अतीमागास प्रवर्गात करण्याची आमची आग्रही मागणी असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का नको : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमीका आधीच स्पष्ट केली आहे. मात्र, त्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर आणि इतर मागास समाजाला आरक्षण देण्यात यावे, असे मत जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी समन्वयातून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली. त्यासाठी आपण मध्यस्थ म्हणून काम करणार असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ओवैसींच्या एमआयएम पक्षांचे ट्विटर अकाउंट हॅक, ‘या’ व्यक्तीचा फोटो पोस्ट केल्याने कार्यकर्ते गोंधळले
- ‘या लबाड कोल्ह्याने औकात पाहून वक्तव्य करावं’, आढळराव पाटलांचा हल्लाबोल
- ‘धाकड’चे शूटिंग पूर्ण होताच अर्जुनने शेअर केली भावूक पोस्ट
- विद्युत जामवालने केले भारतीय फुटबॉलला समर्थन करण्याचे आवाहन….
- SBI च्या YONO APPमध्ये होणार नवे बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

