Share

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उत्साहात, तर दुपारपर्यंत राज्यात 21.47 टक्के मतदान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीच्या कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून आज लोकसभेसाठी दुसऱ्या टप्यातील मतदान सध्या पार पडते आहे.दुसऱ्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 95 मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर राज्यात दुपारी 11 वाजेपर्यंत 21.47 टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १० मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. त्यामध्ये बीड , सोलापूर , उस्मानाबाद , अमरावती , नांदेड या मतदार संघातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

बीड मध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे, प्रीतम मुंडे यांच्या होमग्राउंडमध्ये बजरंग सोनावणे यांनी आव्हान उभे केले आहे. तर सोलापूरमध्ये कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार , वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी अशी तिहेरी लढत पहिला मिळणार आहे.

अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा आणि आनंदराव आडसुळ यांच्या मध्ये चुरशीची लढत पहिला मिळणार आहे. तर उस्मानाबाद मध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आमने सामने आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढती विशेष महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदाना दरम्यान ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात आले आहे. मतदानावेळी कोणताही गैरप्रकार किंवा घोटाळा होऊ नये यासाठी ही विशेष यंत्रणा जोडण्यात आली आहे. सोलापूर मतदार संघात या आतापर्यंत 149 व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!