Share

महाविकास आघाडीत नवाब मात्र सरंक्षला जातो; केशव उपाध्येंचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही भाजपने कायम ठेवली आहे. भाजपकडून विधानभवनच्या पायऱ्यांवर सतत राजीनामा मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मात्र अजूनही मविआ सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. यावरच आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.

“संजय राठोड, अनिल देशमुख, सरकारी वकील प्रकाश चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागतो. महाविकास आघाडीत नवाब मात्र सरंक्षला जातो. हा महा चमत्कार असतो.”, असा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान या अगोदर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांकडून आझाद मैदानावर भव्य मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र अजूनही ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाहीये. ठाकरे सरकार दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!