Share

विषय हार्ड : पहिल्याच षटकात अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना धाडलं माघारी !

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 3 बाद 99 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. मात्र, रहाणे, शर्मा पाठोपाठ एक-एक खेळाडू चांगली कामगिरी न करताच परतले.

रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांना फारशी चांगली कामगिरी करता अली नाही. यानंतर,आर. अश्विनने ३२ चेंडूत १७ धावा काढल्या. मात्र, जो रूटच्या षटकात क्रोलीने अश्विनचा झेल घेत त्याला बाद केले. यानंतर, बुमराहला देखील केवळ १ धाव काढली. जो रुटने आपल्या फिरकीच्या जोरावर भारताला १४५ धावांवर रोखण्यात मोठं योगदान दिलं. रुटने ५ बळी घेतले आहेत.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरवात झाली असून अक्षर पटेलच्या फिरकीची कमाल आज देखील पुन्हा दिसली आहे. या डावाचा पहिल्याच षटकात अक्षरने इंग्लंडच्या दोन खेळाडूंना खातेही उघडी न देता माघारी धाडलं आहे. सलामीवीर झॅक क्रोली आणि फलंदाज जॉनी बेअरस्ट्रो यांचा बळी अक्षरने घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला असून भारतासाठी ही चांगली बाब आहे. दरम्यान, पहिल्या डावात देखील अक्षर पटेलने तब्बल ६ बळी पटकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!