Share

शेवटी विजय हा वाघाचाच होत असतो – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला मत देऊन विजयी करायचं हे जनतेच्या हातात आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, लढायचं आणि जिंकायचं. शेवटी वाघ हा एकटा जिंकत असतो,’ असे म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निष्ण साधला. आज (ता. १३) सिल्लोडमध्ये आयोजित शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ सभेत जनतेला संबोधित केले.

ते म्हणाले, ” निवडणुका येतात आणि निवडणुका जातात; परंतु कधीही खोटे बोलायचे नाही. ही आमची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीच तशी शिकवण आहे. जे मी बोलेन ते मी करेन हा शिवसेनेचा खाक्या आहे. अब्दुल सत्तार यांना शिवसेनेचे विचार पटले आहेत. म्हणून ते एका विचाराने एकत्र आले आहेत. शिवसेनेचा विरोध हा पाकिस्तानला आहे. हिंदू-मुस्लीम यांची इथे एकजूट होईल तेव्हा पाकिस्तानला सुद्धा कळेल की, हे प्रकरण आपल्या हाताच्या बाहेर गेले आहे.”
त्याचप्रमाणे बंडखोर किंवा अपक्ष उमेदवारान ठणकावून सांगा की, निवडून आल्यानंतर एका रुपयात आरोग्याची चाचणी आणि १० रुपयांमध्ये सकस जेवण तू देऊ शकणार आहेस का? असा टोला त्यांनी यावेळी राणेंना लगावला.

दरम्यान कालच शिवसेनेचा जाहीरनामा ठाकरे यांनी प्रसिध्द केला. भाषण करतान त्यांनी शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तसंच बंडखोरांवरही निशाणा साधला. सत्तार आपल्यासोबत आहेत म्हणजे आपल्याकडेच सत्ता येणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1183349253772464128?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183349999200899073?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!