कोल्हापूर : ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान कोल्हापुरमध्ये दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या दोन हजारांहून अधिक जणांविरोधात विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून दंगलखोर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथे अजुनही तणावपूर्ण स्थिती असल्याचे समजते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

