🕒 1 min read
नांदेड : राज्य सरकारला आरोग विभागाच्या परीक्षांचे नियोजन करता आलं नाही, परीक्षा वेळेवर होतील असं सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी रात्री 10 वाजता परीक्षा रद्द केली. त्यामुळे भविष्यात त्यांची जागा ही आर्थर रोड जेलमध्ये असेल, अशी संतप्त टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. ते देगलूर बिलोली निवडणूक प्राचाराच्या वेळी बोलत होते.
राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी आरोग्य मंत्र्याना परीक्षेचे योग्य नियोजन करता आले नाही. विद्यार्थ्यांना वेळेवर हॉल तिकीट मिळाले नाही, परीक्षा केंद्राचा पत्ता, जिल्ह्यात नाही तर राज्य सोडून परराज्यात आणि देशाच्या बाहेरही आले होते. तर एक दिवस अगोदर वेळेवर परीक्षा होईल असे म्हणणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी रात्री 10 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली असे सांगून लाखों विद्यार्थ्यांचे नुकसान केले. त्यामुळे कोरोना काळात परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी खेड्या-पाड्यातून निघालेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. अशा पद्धतीने वागणाऱ्या ह्या आरोग्य मंत्र्याची जागा ही भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, पडळकरांनी नांदेडमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. ‘नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसून गांजावाले व हर्बल तंबाखूवाल्यांचे प्रवक्ते आहेत असा आरोपही गोपीचंद पडळकरांनी केला आहे. तर या निवडणुकीत मत मागण्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण दारात आले तर पायातले हातात घ्या’, असा अजब सल्ला गोपीचंद पडळकरांनी देगलूर बिलोली येथील मतदारांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर शंका उपस्थित केली तर कायदा व्यवस्थेला धोका आहे’
- ‘जीआरमध्ये ‘संभाजीनगर’ नाव आलंय, लवकरच घोषणाही होईल’, संजय राऊतांचा दावा
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला


