🕒 1 min read
अकोला : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपसोबत दोन दशकांहून अधिक काळ असलेली मैत्री तोडली. यानंतर, शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. तर, सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे.
महाविकास आघाडी आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता त्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसह इतर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये देखील होत आहे. कुठे या तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव आहे तर कुठे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र युती करून लढतील असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं होतं. अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची नांदी झाली होती. आता अकोल्यात पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचं समोर आलं आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होऊन दोघात युती झाली. त्यानुसार 9 जागांवर शिवसेना तर 5 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या. तर, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून सर्वाधिक यश संपादन करण्याचा विश्वास देखील स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी तथा पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार यांना ‘असा’ मुख्यमंत्री कसा चालतो? – नारायण राणे
- ‘त्यांना न्याय मिळायला हवा होता’, एल्गार परिषद प्रकरणातील स्टॅन स्वामींना राहुल गांधींची श्रध्दाजंली
- ‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा’
- समाजासाठी गट-तट न पाडता एकत्र येत लढा उभारावा, मराठा क्रांती मोर्चाच्या मंथन परिषदेत आवाहन!
- ‘१२ आमदारांचे निलंबन म्हणजे नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
