पुणे : पाणी हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जाण्यासाठी व शरीराची कार्य प्रणाली योग्य प्रकारे सुरू राहावी, यासाठी दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे; असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून वारंवार दिला जातो. काही डॉक्टर तर नियमित सकाळी लिंबू आणि मध मिक्स करून एक ग्लास कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते.
पाणी पिण्याची योग्य वेळा आणि महत्व :
1.सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ग्लास दोन पाणी प्यावे. कोमट किंवा साधे पाणी देखील पाणी पिऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करू शकता. अथवा मध देखील वापरू शकता.
2.पाणी प्यायल्यानंतर दात स्वच्छ घासून घ्या. यानंतर थोडा वेळ काहीही खाऊ तसंच पिऊ नये. यानंतर आपण आपल्या दिनक्रमास सुरुवात करू शकता.
3.जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.
4.आजारी असलेल्या वयोवृद्ध लोकांनी सुरुवातीस एकच ग्लास पाणी प्यावे. यानंतर पाणी पिण्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे.
5.एकाच वेळेस आपणाला दोन ग्लास पाणी पिणे शक्य होत नसल्यास, ग्लासभर पाणी प्यायल्यानंतर थोडा वेळ थांबा; जेणेकरून तुमच्या पोटाला थोडासा आराम मिळेल.
6.दरम्यान योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास पोटासह संपूर्ण शरीराचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
7.याव्यतिरिक्त थंड पाणी पिणे टाळावे. थंड पाण्यामुळे शरीराच्या जठराग्नीवर वाईट परिणाम होतात तसंच काही रक्तदाब वाढण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते.
8.आरोग्य निरोगी पाणी पिणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची तज्ज्ञ पथकामार्फत तपासणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल – अजित पवार
- आज पुन्हा इंधन दरवाढ ! मुंबईत पेट्रोलने गाठला उच्चांक
- गडाखांचा धडाका : राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी तब्बल १६८ कोटींची मंजुरी
- रहाणेनं मैदानाबाहेरही जिंकली मनं; कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास दिला नकार
- प्रजासत्ताक दिनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, राजशिष्टाचार विभागाचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
