मुंबई : ‘तुम्ही राईचे तेल तुमच्या नाकपुडयांमध्ये टाकले तर करोना व्हायरस वाहून खाली तुमच्या पोटामध्ये जाईल. तिथे असणाऱ्या अॅसिडमुळे त्याचा मृत्यू होईल,’ असं दावा प्रसिद्ध योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी केला आहे.
तसेच पुढे ते म्हणाले, ‘ज्या व्यक्तींना हायपरटेंशन, ह्दयाचा आजार, डायबिटीस आहे त्यांनी ३० सेकंदासाठी आणि तरुणांनी एक मिनिटासाठी श्वास रोखून धरला तर याचा अर्थ तुम्हाला करोना व्हायरसची लागण झालेली नाही,’ असं बाबा रामदेव म्हणाले.
याचप्रमाणे कुठलीही व्यक्ती एक मिनिटासाठी श्वास रोखून धरत असले तर याचा अर्थ त्या व्यक्तीला करोना व्हायरसची बाधा झालेली नाही,’ अशी माहिती बाबा रामदेव यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचे ८११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ३२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

