जालना : बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या दोन महिलांनी एका महिलेचे अडीच लाखांचे दागिने लांबवण्याची घटना समोर आली आहे. ६ मार्च रोजी औरंगाबाद-जालना प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे.
औरंगाबाद येथून एक महिला भावाच्या लग्नासाठी बसने जालन्यात येण्यासाठी प्रवास करीत होती. दरम्यान, करमाड येथून बाजूला बसलेल्या दोन महिलांनी प्रवासात त्यांचं लक्ष नसताना त्यांची पिशवी लंपास केली. या पीशवीत २ लाख ४० हजार रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील पिसादेवी भागातील रहिवासी अंजली संदीप कुटे यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील अधिक तपास सदर बाजार पोलिस ठाण्याचे रुपेकर हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोविड सेंटरमध्ये रूम देण्याच्या कारणावरून रुग्णांची नोडल अधिकाऱ्यांना मारहाण
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेडमध्ये हायवा घुसला, झोपलेल्या कामगारांना चिरडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

