नवी दिल्ली- गेले काही दिवस भारत आणि चीनमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. ग्ल्वान खोऱ्यात झालेल्या घटनेमुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शांतीच्या गप्पा मारणाऱ्या चीनची आगळीक दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.
भारत-चीन संबंधांवरून खासदार राहुल गांधी यांनी भाजापवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असा छातीठोकपणे दावा गांधी यांनी केला आहे.
हरयाणामधल्या सभेत बोलताना त्यांनी हा अजब दावा केला. यावेळी बोलताना गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरुन स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात.
#WATCH The coward PM says that no one has taken our land. Today, there is only one country in the world whose land has been taken by another country. And PM calls himself a 'deshbhakt'. If we were in power we would've thrown out China in less than 15 mins: Rahul Gandhi in Haryana pic.twitter.com/JarmXUMTFs
— ANI (@ANI) October 6, 2020
गांधी म्हणाले, चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्यानं पाऊल ठेवलं आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली. जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किमी मागे ढकललं असतं.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘अजून बाळंतीण झाली नाही आणि हे नाव ठेवून मोकळे’; दरेकरांचा देशमुखांना टोला
- सर्व सफाई कर्मचा-यांची कोव्हिड तपासणी करा; महापौरांनी दिले निर्देश
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- #Corona : नियम भंग करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द
- अनंत करमुसे प्रकरणात पोलिसांवर कारवाई झाली, आव्हाडांना अटक कधी होणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

