नागपूर: ईडी कारवाईवरून मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केंद्र सरकारवर टीका केली होती. दरम्यान आता यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सींचा वापर करण्याच्या विरोधात आहेत. ते कधीच एजन्सीचा गैरवापर करत नाहीत. आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मागच्या काळात काँग्रेस आणि इतरांनी एजन्सींचा दुरुपयोग केला. आम्ही तसा गैरवापर केला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाही. असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या मेळाव्यात ना विचार होता, ना सोनं होतं. केवळ फ्रस्ट्रेशन होतं. असे म्हणत हे फ्रस्ट्रेशन म्हणजे असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं वक्तव्य निघते. अशी टीकाही त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

