Share

‘शेतकरी लखीमपुरचा असेल तरच लक्ष देणार का महाराष्ट्रातील संवेदना शुन्य सरकार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील १७ वर्षीय शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नकसान झाले आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाकीची असल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून हातात पिकच येत नसल्याने निराश झालेल्या 17 वर्षीय सेजलने आत्महत्या केली आहे. आता यावरूनच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

शेतकरी लखीमपुरचा असेल तरच लक्ष देणार का महाराष्ट्रातील संवेदना शुन्य सरकार. महाराष्ट्रामध्ये १७ वर्षीय शेतकऱ्यांच्या मुलीने आई वडीलांना भार होत आहे म्हणून आत्महत्या केली आहे. आपण राज्यात कधी लक्ष देणार आहात? असा संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील छिंदवाडीत राहणारी 17 वर्षीय सेजल जाघव या तरुणीने आत्महत्या केली आहे. शेतात काहीही पिकत नाही. घर चालवण्यासाठी, शिक्षणासाठी कर्ज काढले आहे. शाळेत जाण्यासाठी कपडेही नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे तिने ही टोकाची भूमिका घेतली. दरम्यान मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!