लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दि. ४ऑगस्ट, बुधवारी गोरखपूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘लाईव्ह हिंदूस्तान’च्या शशी शेखर यांच्याशी संवाद साधला. मुलाखती दरम्यान योगींनी उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम दंगलींवर भाष्य केले.
ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांच्या काळात मला अनेक धर्माच्या लोकांना भेटण्याचा योग आला. विविध लोकांनी मला बोलावले. मी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतो. चांगले बोलतात ते. आज राज्यातील प्रत्येक व्यक्ती मान्य करेल की दंगली होत नाहीयेत. दंगली झाल्या तर हिंदू मरेल मग मुसलमान सुरक्षित राहील का. एक गट मरेल तर दुसऱ्यालाही त्याची झळ बसेल. एक गट सुरक्षित असेल तर दुसरा गट देखील सुरक्षित राहील असे म्हणत त्यांनी सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन केले.
राम आपले पूर्वज आहेत. मी हे म्हणत नाहीये, जगातील सर्वात मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया आपले पूर्वज रामाला मानतो. इंडोनेशियात मुस्लिम देखील रामलीला करतात. आपण कोणत्या युगात जगत आहोत. राम आपले पूर्वज असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. आपल्याला गर्व वाटायला हवे. इंडोनेशियाला यावर गौरव वाटत असेल तर आपल्याला का वाटू शकत नाही. रामाशी आपला संबंध असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. जर काहींना असे वाटत नसेल तर मला त्यांच्या डीएनएवर शंका येते असेही योगी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! पूजा चव्हाणने आत्मत्येपूर्वी मद्य प्राशन केले होते; केमिकल अँनालायसेसचा अहवाल
- ‘महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार?’, प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल
- ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

