मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल (२५ फेब्रुवारी)एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला निशाण्यावर धरले. यावेळी त्यांनी तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का? असा सवाल करत टोला लगावला. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्री महोदय, लोकांनी तुम्हाला बुडवण्याचा निश्चय केला असेल तर त्यांना रोखणार तरी कोण? पण सत्ता गेल्यावर टक्केवारीचा माल बंद झाला तरी खंडणीतून येणारा पैसा सुरूच राहील की?”, असा सवाल करणारे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री महोदय, लोकांनी तुम्हाला बुडवण्याचा निश्चय केला असेल तर त्यांना रोखणार तरी कोण?
पण सत्ता गेल्यावर टक्केवारीचा माल बंद झाला तरी खंडणीतून येणारा पैसा सुरूच राहील की? pic.twitter.com/qiblEBCi5B— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 26, 2022
दरम्यान “सत्ता मिळवा पण ती लोकशाही मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचे राजकारण नासवले जात आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघातील दुखापतीची मालिका संपेना ; ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर
“…वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”, रशियाने दिली अमेरिकेला धमकी
“हे मुख्यमंत्री की टोळीप्रमुख?”, मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे आजपासून आमरण उपोषणाला बसणार
राष्ट्रवादी नेत्याकडून अमृता फडणवीसांचा आक्षेपार्ह उल्लेख; भाजपचा इशारा


