🕒 1 min read
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. यातच भरीस भर म्हणजे पिक विमा कंपन्यांची देखील मुजोरी शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्यसरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी असेही अजित पवार यांनी सांगितले.
आम्ही वेडंवाकडं करा असं काही सांगत नाहीय. पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला… कास्तक-याला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही तर पालिकेवर काढणार हंडा मोर्चा; संतप्त महिलांचा इशारा!
- भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याआधी जाणून घ्या कोणता संघ आहे वरचढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
