Share

हिंदू एकत्र आले नाही तर देशाची फाळणी होईल- साक्षी महाराज

Published On: 

जबलपूर: भाजपा खासदार साक्षी महाराज म्हणाले, हिंदू एकत्र आले नाही तर देशाची फाळणी होईल तसेच श्चिम बंगालमधील परिस्थिती चिंताजनक असून जिथे जिथे हिंदू कमी झाले तिथेच दंगली होत आहेत. ते शनिवारी जबलपूरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान त्यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले.

देशात मोदींना हटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोदींसारखी लोकं इतिहास घडवण्यासाठी जन्माला येतात. विरोधकांची महाआघाडी झाली तरी त्यांच्यात नवरा मुलगा कोण असेल, असा प्रश्न विचारत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. काँग्रेस प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली.

राम मंदिराबाबत भाष्य करतांना साक्षी महाराज म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचे काम लवकरच सुरु होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनेच येईल. २०१९ पूर्वीच मंदिराच्या कामाला सुरुवात होईल आणि कोणीही राम मंदिराच्या कामाला रोखू शकत नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!