Share

निर्यातबंदी कायमस्वरूपी न उठविल्यास, कांदा सीमापार आंदोलन करू- अनिल घनवट

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली सहा ते सात महिने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले होते.

आता केंद्र शासनाने फक्त दोन जातीच्या कांद्याची मर्यादीत निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा आहे. निर्यातबंदी कायमस्वरूपी न उठविल्यास, ‘कांदा सीमापार’ आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनेने अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे.

सप्टेंबरमध्ये कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली होती.

त्याविरोधात अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. आता सरकारने ९ ऑक्टोबर रोजी निर्यातबंदी आदेशात बदला केला आहे. त्यानुसार, बँगलोर रोज व कांशीपुरम् या जातीच्या प्रत्येकी दहा हजार टन कांद्या‍च्या निर्यातीस परवानगी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर अन्याय करणार असून कांदा निर्यातबंदी उठविण्यात यावी, अशी मागणी अनिल घनवट यांनी केली आहे.

सरकारने कांद्याच्या व्यापारात हस्तक्षेप करू नये. सर्व जातीच्या कांद्याची निर्यात कायमस्वरुपी खुली असावी. तसेच सरकारने महाराष्ट्रातील कांदा निर्यातीस परवानगी न दिल्यास कांदा सीमापार आंदोलन करू, असा इशाराही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!