Share

रायगड लोकसभा मीच जिंकणार, अनंत गीतेंनी व्यक्त केला विश्वास

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांसाठीचे महाराष्ट्रातील मतदान नुकतेच संपले आहे. आता जनतेला प्रतीक्षा आहे ती २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालाची. अशातच रायगडमध्ये आपला विजय निश्चित असल्याचं प्रतिपादन अनंत गीते यांनी केले आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात मतदारांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले असून आपला विजय निश्चित आहे. कारण जिल्ह्यातील मतदारांनी माझ्या मागे ठाम राहून मतदान केले आहे. तसेच अदृश्य हातांनेही यावेळी मला मतदान केले आहे. त्यामुळे 23 मेला मतमोजणीचा कल हा माझ्या बाजूनेच लागणार असं विधान त्यांनी मतदार व शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना केले आहे.

दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अनंत गीते यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुनील तटकरे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे रायगडमध्ये रंगतदार लढत होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!