सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शाहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.
भाजपचे बडे नेते एकत्र आले असून हा कार्यक्रम जरी राजकीय नसला तरी राज्यातील राजकारणावर हे नेते काय भाष्य करणार याची उत्सुकता वाढली होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपपूर्वी फासे बदलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमित शाह राज्यात आल्याने ऑपरेशन लोटस चा मुहूर्त ठरणार का ? अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या.
दरम्यान, अमित शाह यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. पुढे त्यांनी भाजपसोबतची युती सोडताना शिवसेनेनं केलेल्या आरोपांवर देखील प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली होती. यावेळी, त्यांनी समान सत्तावाटप व मुख्यमंत्री पदाबाबत देखील शब्द दिल्याचं उद्धव ठाकरे व शिवसेनेतर्फे कडून सांगण्यात आलं होतं. भाजपने शब्द न पाळल्याने शिवसेनेनं युती तोडल्याचं सांगण्यात येत होतं.
उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे नेमकं अमित शाह व त्यांच्यामध्ये बंद खोलीत काय झालं होतं याच्या दुसऱ्या बाजूवर अमित शाह यांनीभाष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील अमित शाह यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
- महाराष्ट्राचे ‘दबंग नेते’ म्हणून नारायण राणेंची ओळख – देवेंद्र फडणवीस
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’


