🕒 1 min read
मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यावरुन चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. ‘राज्यातील शाळा बंद आणि बार सुरु, महाविकास आघाडीला क्लास पेक्षा ग्लास महत्वाचा’, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊंवर निशाणा साधत ‘शाळा आणि बार याचं कॉम्बिनेशन करणे हे मुर्खाचं लक्षण आहे, सदाभाऊ यांच्या बुद्धीची किव येते’. अशी टीका केली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आपण मला मूर्ख म्हटल्याचं नाही तर शालेय विद्यार्थांसाठी आपण काहीच केलं नाही ह्याचंच वाईट वाटतं.@KishoriPednekar
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 10, 2022
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘आपण मला मूर्ख म्हटल्याचं नाही तर शालेय विद्यार्थांसाठी आपण काहीच केलं नाही याचंच वाईट वाटतं.’ असे ट्विट सदाभाऊंनी केले आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुळात सदाभाऊ खोत आणि माझी फारशी ओळख नाही. बार आणि शाळा यांचे काँबिनेशन करणं हेच किती मुखार्च लक्षण आहे. शाळा ही लहाण मुलं बाधित होताहेत लहाण मुलांकडं दुर्लक्ष करायचं, आणि राज्य चालवण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात, बारचं जे काही म्हणतात, जी राज्याची एसओपी तीच मुंबईची एसओपी आहे, शाळा आणि बार यांचं काँबिनेशन करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- यंदाचा IPL सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार आग्रही, …BCCI चा B प्लानही तयार
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
