मुंबई : वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदे (Fram Laws ) मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्यांच्या मागण्यांपुढे दीड वर्षानंतर का होईना अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. यावर आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत बोलताना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Around 700 farmers died in farmers' agitation. PM apologised to the nation & farmers of the nation. He accepted that he made a mistake. On 30th Min Agri Min was asked a ques – how many farmers died in the agitation? He said he doesn't have any data: Congress MP Rahul Gandhi in LS pic.twitter.com/ztL4wm0C0h
— ANI (@ANI) December 7, 2021
संसदेत बोलत असताना राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचे अनेक मुद्दे उपस्थित केले आहे. ‘शेतकऱ्यांना त्यांचे हक्क, नोकऱ्या आणि नुकसानभरपाई मिळावी. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात जवळपास ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देश आणि शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे. त्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांच्याकडून चूक झाली, पण आता पंतप्रधान किती वेळा माफी मागणार?,’ असा सवाल करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
यानंतर राहुल गांधी कृषीमंत्र्यांवर टीका करत म्हणाले की, तुमचे सरकार म्हणते की मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी नाही. मी संसदेत आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण यादी ठेवत आहे. पंजाब सरकारने ४०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे. याशिवाय १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी दिली आहे. माझ्याकडे पूर्ण यादी असल्याचे ते म्हणाले आहेत .
महत्वाच्या बातम्या:
- स्वार्थासाठी एकत्र आलेल्या 3 पक्षांचे सरकार; सुजय विखे पाटलांची टीका
- ‘उपोषण करा नाहीतर मरा, सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही’
- राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’सत्तेसाठी हिंदुत्वाचे नेसण सोडणाऱ्यांना…’
- …म्हणून एसटी संप चिघळला; माजी मंत्र्याचा राज्यसरकारवर आरोप
- ‘कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार’


