🕒 1 min read
मुंबई : २०२० हे वर्ष संपलं असून आता २०२१ या वर्षासह नव्या दशकाला देखील सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे सर्वच नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता. याच काळात, उद्योग-व्यवसायावर देखील विपरीत परिणाम झाला. यामुळे अनेकांना आपला रोजगार देखील गमवावा लागला होता.
राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं होतं. मनसेने वीजबिल माफीवरुन आक्रमक भूमिका राज्यभर आंदोलन केलं. तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
अद्यापही राज्य सरकारने या वीजबिलांबाबत ग्राहकांना दिलासा दिलेला नाही. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच विबिल माफीची आठवण करून दिली आहे. ‘मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?’ असा सवाल करत मनसेने पोश्टरबाजी केली आहे. या आशयाचा बॅनर मनसेने मातोश्री बाहेरच लावला असून मुख्यमंत्री साहेबांची नजर पडून याची दाखल ते घेतील असा टोमणा देखील मनसेकडून लागवण्यात आला आहे.
मा.महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आले …
गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले.जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा @NitinRaut_INC उर्जा मंत्री म्हणाले..@CMOMaharashtra साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले…?#मुख्यमंत्रीवीजबिलाचंकायझालं ? @mnsadhikrut pic.twitter.com/XN0cURJvzl
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा मुख्यमंत्री असुनही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर का होत नाही : मनसे
- भारताने शेवग्याच्या पावडरीची जागतिक मागणी लक्षात घेऊन त्याच्या निर्यातीचा केला आरंभ
- ‘व्होडाफोन आयडिया’ 3G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी…
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 लस वितरणासाठी सज्ज रहाण्यास सांगितले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
