टीम महाराष्ट्र देशा: देशात जोवर हिंदुत्व टिकून आहे तोवर हुकूमशाही, यादवी कदापि येणार नाही. जे भाजपला सोडून गेले त्यांना जाऊ दे, असे भाजप त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांनी सांगितले. ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करतांना खंत व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर २५ वर्षे तुमच्यासोबत शिवसेना असताना तुम्हाला जरा अच्छे दिन आले आणि तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी प्रकाशन सोहळ्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
