🕒 1 min read
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी ‘हिरो मोटोकॉर्प’ ही आता दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना व्यतिरिक्त लवकरच आपले चार चाकी वाहन आणण्याच्या तयारीत आहे. नुकतंच हीरो मोटोकॉर्प ने आपलं दहा कोटी दुचाकी विक्रीच लक्ष्य पूर्ण केलं आहे.
या कार्यक्रमादरम्यान कंपनीचे चेअरमन पवन मुंजाल यांनी कंपनीच्या भविष्यातील योजनेबद्दल सांगताना आपण लवकरच बदलत्या वाहन प्रणालीच्या पार्श्वभूमीवर चार चाकी वाहन आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.
‘हिरो मोटोकॉर्प’ कंपनीने गेल्या काही वर्षात बेंगलोर येथील स्टार्टअप कंपनी अथर एनेर्जी मध्ये जवळपास ३५ टक्के भागीदारी मिळवली आहे. अथर एनेर्जी इलेक्ट्रिक ही दुचाकी वाहन निर्मिती करणारी कंपनी आहे. तर आता ‘हिरो मोटोकॉर्प’ आपली २०२१-२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेनोची ‘एसयूवी किगर’ भारतात लाँच; जाणून घ्या किंमत…
- ‘आर.आर.आबांना जाऊन अनेक वर्षे झाली मात्र आजही गडचिरोलीतील लोक त्यांची आठवण काढतात’
- इलेक्ट्रीक वाहनांना पर्यायी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्याची गडकरींनी व्यक्त केली आवश्यकता
- आपत्तींवर मात करुन पुढे चालत राहणे हेच मुंबईचं वेगळेपण – अजित पवार
- जय्यत तयारी सुरु ! भारत विरुद्ध इंग्लंडमधील चेन्नई कसोटींसाठी २ नव्या पंचांची नियुक्ती


