🕒 1 min read
तुळजापूर – राज्यातील शेतकरी सध्या निसर्गाची अवकृपा आणि कोरोनाचा विषाणू अश्या दोघाच्या कचाट्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक तेलगंणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना रबी पेरणी साठी हेक्टरी पंचवीस हजार रुपयाची मदत करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली आहे.
निवेदनात म्हटलं आहेकी कोरोना पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊन मुळे शेतकऱ्यांचा शेतमाल फळे भाजीपाला विकला न गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असुन शेतकऱ्यांन जवळ सध्या रबी पेरणी, बिबियाणे खते विकत घेण्यासाठी पैसे नाहीत.
शेतकरी वर्गाची दयनीय स्थिती लक्षात घेऊन तेलगंणा कर्नाटकातील शेतकऱ्यांना तेथील शेतकऱ्यांना रबीपेरणी साठी अर्थिक मदत केल्याने शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये अर्थिक मदत द्यावी म्हणजे तो रबीपेरणी करू शकेल.
आर्थिक मदत न दिल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना वतीने आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी निवेदन देवुन दिला. यावेळी बापुसाहेब भोसले सुनिल घाडगे सह शेतकरी उपस्थितीत होते.
‘बोऱ्हाडे-शेरकर’ प्रकरणात कोल्हेंसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही’
‘अक्षय बोऱ्हाडेने शिवप्रेमी आणि सर्वसामान्य लोकांना शिवछत्रपतींचे नाव वापरून फसवले’
#व्यक्तिविशेष : शरद जोशी आठवतात का ? शेतकऱ्यांचे सुवर्णयुग आणण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
