🕒 1 min read
औरंगाबाद : वैजापूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून हाहाकार उडाला आहे. तालुक्यात दोन ठिकाणी विज कोसळली ग्रामीण भागातील अनेक गावांत पाणी शिरले. रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटला. मात्र या धुव्वाधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री अतिवृष्टी व ढग फुटीच्या जोरदार पावसाने वैजापूर शहराला झोडपले. तसेच गंगाथडी भागात ढगफुटी जन्य जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश गावातील नागरिकांचा संपर्क तुटला. ओढे, नाले ओसंडून वाहू लागले. तालुक्यातील विरगांव लाडगाव, विजरगांव, कापूसवाडगांव, हनुमंतगांव म्हस्की वाड्यातील नागरिकांचा संपर्क तुटला होता. विरगांव येथील नदीला पूर आल्याने शिरगांव गावात घरात पाणी शिरले. तसेच तालुक्यातील लाडगांव येथे गावातील अमोल दत्तू निकम यांच्या घरावर विज कोसळल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणासह अनेक संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले.
अनेक ठिकाणी घरालाही तडे गेले. तसेच गावातील शाळेत पाणी शिरले. वैजापूर, श्रीरामपूर मार्गावर सावखेडगाव लाडगांव रोडवरील पाणी आल्याने सकाळी दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच तालुक्यातील धोंदलगांव येथील शेत गट नंबर ११९ मध्ये शेतकरी कचरु गंगाधर आवारे यांच्या शेतवस्तीवर सकाळी वीज पडून एक बैल जागेवर ठार झाला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- अभिनेता परेश रावल ‘omg 2’ चित्रपटात दिसणार नाही.., कोण साकारणार ‘ही’ भूमिका?
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
