🕒 1 min read
कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. तसेच भाजप नेत्यांनी देखील नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी भाजप आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.महाविकासआघाडी ला बदनाम करण्याचे षड्यंत्र असून याचा एकत्रितपणे मुकाबला केला जाईल असा इशारा यावेळी आला.
या कारवायांवरुन सोशल मीडियावर देखील महाविकास आघाडी आणि आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जाते. यापुढे त्यांनाही जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिला. मंत्री मलिक यांचे दाऊदशी संबंध होते तर मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी कारवाई का केली नाही, असा सवाल मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
नवाब मलिकांची प्रकृती खालावली; जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु
IPL 2022 : आयपीएलच्या उद्घाटनाची तारीख ठरली ; मैदानावर गर्दीही दिसणार!
राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर नील सोमय्यांची अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव
नवाब मलिक यांच्या समर्थनात येवल्यात राष्ट्रवादीचा रस्ता रोको; भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी
“…म्हणून या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू करावं लागेल”, आशिष शेलारांचा निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

