🕒 1 min read
मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच आता कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का?या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना १० दिवसांमध्ये ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा देत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेवर आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी उत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,’सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. सोमय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन आहे का? कोरोना काळात लोक सेवाभावी वृत्तीने लोक शासनाला मदत करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं पाहिजे’, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’काही सत्ताधारी नेते स्वत:चे राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट,लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे.’
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया;म्हणाले…
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- वृद्ध शेतकऱ्याने कानशिलात लगावल्यानंतर ‘त्या’ भाजप आमदाराने दिले स्पष्टीकरण
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
