बुलडाणा: माजी मंत्री संन्जय कुटे यांनी पिक विम्यावरून सरकारवर चांगलीच टीका केली आहे. सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. शुक्रवारी दि. २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पिक विमा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या वर्षापासूनचा पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला, आंदोलने केली, निवेदने दिली, परंतु कुठलीही दखल घेतली गेली नाही आणि सर्व प्रक्रियेत मात्र महा विकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांच्या आमदारांची आणि नेत्यांची भूमिका संशयास्पद असल्याची शंका माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी व्यक्त केली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा संदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीला कंपनीचे अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने डॉ. संजय कुटे यांनी या बैठकीतून निघून येत पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार
- खासदार संभाजी राजे साधणार मराठा समाजातील युवकांशी संवाद, रमेश केरे पाटील यांची माहिती
- ‘फडणवीस सरकारचा कायदा अवैध, मराठा आरक्षणाला हरताळ फासण्याचे पाप भाजपचेच’
- कृषी कायद्यांवरील शरद पवारांच्या भूमिकेचे मोदी सरकारकडून स्वागत!
- ‘महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून तिघांच्या खिशात खंजीर’, रावसाहेब दानवेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

