Share

Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक – गोपीचंद पडळकर

Published On: 

🕒 1 min read

सांगली : सांगलीतील वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात बोलत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर आक्रमक शब्दात टीका केली आहे. “20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर सेना आमदार सुरतला गेल्याची बातमी आली. त्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा बघा कसा झाला होता. सत्ता गेल्याच सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे”, असा टोला त्यांनी यावेळी जयंत पाटलांना लगावला आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, “सत्ता असेल तरच जयंत पाटील काम करु शकतात. ते सत्तेच्या विरोधात काम करु शकत नाही. त्यामुळेच शरद पवार कधी घरात बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो, अशी भावना जयंत पाटलांची झाली आहे. आमची भावना तशी नाही कारण आम्ही सामान्य लोकांमधून आलो आहोत आणि त्यांच्यासाठीच काम करत आहोत. त्यामूळेच भाजपच्या एकाही आमदाराची इच्छा झाली नाही कि आमचा पक्ष सोडून सत्ताधारी पक्षाबरोबर जावं” त्याचबरोबर जयंत पाटील यांच्यासह त्यांचा भाचा सोडला तर एकही व्यक्ती त्यांच्याबरोबर नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!