नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल किफायती दरात बांगलादेश येथे निर्यात करता यावा, यासाठी विशेष किसान रेल सुरु करण्यात यावी म्हणून नितीन गडकरी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्ण पाटील आणि इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विदर्भातील संत्री आता बांगलादेशात पोहोचणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रस्तावाला रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वार्षिक उत्पादनाच्या दोन तृतीयांश सुमारे अडीच लाख टन संत्रा दरवर्षी बांगलादेश येथे निर्यात करण्यात येतो.
मात्र, थेट रेल्वेची सुविधा नसल्याने रस्त्याने संत्र्यांची मालवाहतूक होते. विदर्भातून बांगलादेशपर्यंत रस्त्याने मालवाहतूक करताना साधारणत: ७२ तास लागतात. जर किसान रेल्वे सुरु झाल्यास ३६ तासात शेतकऱ्यांचा माल बांगलादेशच्या बाजारात उपलब्ध होवू शकेल. तसेच निर्यातीच्या खर्चामध्ये कपात होईल आणि त्यामुळे मालाची गुणवत्ता चांगली राहील. रेल्वे विभागाने नितीन गडकरी यांच्या या प्रस्तवाला हिरवा कंदील दाखविला असून लवकरच याचा रोडमॅप तयार करण्यात येईल, असे आश्वासन सोमेश कुमार यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या:-
- ऊर्जामंत्र्यांच्या कार्यालयाला कोरोनाचा विळखा, तरीही विलगीकरणात न जाता मंत्री करणार पाहणी दौरा
- कोरोनाची धास्ती कायम, येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय बंद ठेवण्याची होतेय मागणी
- मुंबई महापालिकेने दिली आणखी एक नोटीस,कंगणा रनौतची अडचण वाढली
- मराठा आरक्षणासाठी युक्तिवाद करु नये असं फडणवीसांनीच सांगितलं होतं- महाधिवक्ता कुंभकोणी
- राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरं उघडावीत नाही तर आम्हाला स्वतः उघडावी लागतील: भाजप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

