Share

प्रवाशांसाठी सुखद वार्ता! औरंगाबाद-दिल्ली विमानाचे आता दररोज उड्डाण होणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे बंद असलेली असलेली इंडिगो सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. तसेच आता या विमानाचे दररोज उड्डाण होणार आहे. इंडिगोकडून दिल्लीसाठी विमान सुरू झाले होते. त्यानंतर ५ जूनपासून दिल्ली-औरंगाबाद -दिल्ली हे विमान सोमवारी सुरू करण्यात आले. मात्र आता दररोज विमानाचे उड्डाण होणार असल्याने विमान प्रवाशांच्या सुविधेत मोठी भर पडली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही आठवड्यातून पाच दिवस एअर इंडियाची मुंबई -औरंगाबाद -दिल्ली आणि दिल्ली- औरंगाबाद-मुंबई विमानसेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होती. दरम्यान गेल्या काही दिवसात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोना बाधितांची संख्या ही आता कमी झाली आहे. त्यामुळे एअर इंडियाचे दिल्ली आणि मुंबई विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस उडाण घेणार आहे. अशी माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन कमिटीचे अध्यक्ष सुनील कोठारी यांनी दिली.

तर इंडिगो विमान दिल्लीसाठी सुरू करण्यात आले होते. त्यामुळे सध्या साडेचार ते पाच हजार रुपयांमध्ये औरंगाबाद ते दिल्ली असा प्रवास होणार आहे. दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली हे विमान आठवड्यातील तीन दिवस चालवण्यात येत होते. सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे विमान सुरु होते. मात्र प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आता आठवड्याचे सातही दिवस औरंगाबाद दिल्ली विमानसेवा सुरू राहणार असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहेे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!