नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आज बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
कृषिमंत्री म्हणाले, गेल्या ७ वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल. एमएसपी २०१८ पासून किंमतीवर ५० टक्के परतावा जोडून घोषित केले जाते. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर तांदूळ पिकावरील एमएसपीमध्ये ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Cabinet has approved MSP for kharif crops for marketing season 2021-22. Highest absolute increase in MSP over the previous year has been recommended for sesamum (Rs 452 per quintal) followed by tur & urad (Rs 300 per quintal each): Govt of India
— ANI (@ANI) June 9, 2021
यानंतर आता तांदळाची किंमत १८६८ रुपये प्रति क्विंटलवरून १९४० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे. याच बरोबर, बाजरीवरील एमएसपीदेखील २१५० रुपये प्रतिक्विंटलवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.
केन्द्रीय मंत्रिमंडल ने कृषि उपज की सरकारी खरीद, सीजन 2021-22 के लिए खरीफ फसलों के न्यूनतम समर्थन मूल्यों (एमएसपी) को स्वीकृति दी…
किसानों को मिलेगा उनकी उपज का अधिक दाम…https://t.co/7BSD2KIEQz pic.twitter.com/ocyAYxi3bz
— Narendra Singh Tomar (@nstomar) June 9, 2021
चालू खरीप हंगामासाठी (केएमएस) २०२०-२१ (६ जून २०२१ पर्यंत) गेल्या वर्षीच्या ७३६.३६ एलएमटीच्या तुलनेत एमएसपीवर ८१३.११ एलएमटीपेक्षा जास्त धान्य येथे खरेदी केले गेले. त्यामुळे १२० लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे तोमर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- स्पेशल स्टोरी! चौकडीतील ज्योतिरादित्य, जितिन यांनी सोडली राहुल यांची साथ; आता ‘ते’ दोघे काय करणार?
- शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणखीन अडचणीत, पर्यटन मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश
- शिवसेनेकडून आगामी मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा; काँग्रेस-राष्ट्रवादीत संभ्रम
- ‘ज्येष्ठांना घरी जाऊन सध्या तरी लस देणार नाही’, मोदी सरकारची भूमिका
- ‘मोदी सरकारकडून कोरोनामुळे मृत रुग्णांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

