Share

‘खेळ आता सुरु झालाय’; अर्णबने उद्धव ठाकरेंना ललकारलं

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज रुममध्ये दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी ‘खोट्या’ प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला.

सर्वोच्च न्यायालयाने अर्णबचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर तळोजा कारागृहाच्या बाहेर दुतर्फा तुफान गर्दी झाली होती. जनतेच्या पाठिंब्याला प्रतिसाद देऊन त्यांनी आभार व्यक्त केले. यानंतर अर्णब थेट न्यूजरूममध्येच दाखल झाला.

रिपब्लिक चॅनलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत असलेल्या गोस्वामीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय. उद्धव ठाकरे तुम्ही मला एका जुन्या, खोट्या प्रकरणात अटक केली. आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ आता सुरु झाला आहे.’ असं म्हणत त्याने उद्धव ठाकरेंसह महाराष्ट्र सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!