Share

पारनेर तालुक्यातील केवळ एका जागेसाठी चार गावे 25 लाखांना मुकले

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, ४ तारिखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असून सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून पारनेर तालुक्यातील १० व नगर तालुक्यातील १ अशा एकूण ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. तर ४ गावांतील एका जागेमुळे त्या गावची निवडणुक लागली आहे. विशेष म्हणजे आमदार लंके यांच्या प्रयत्नातून जवळपास २१० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आ.लंके यांचे स्वत:चे गाव असणारे हंगा ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध झाले आहे.

दरम्यान, चार गावांत फक्त एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने त्या गावांची 25 लाखाच्या विकास निधीची लॉटरी हुकली आहे. तालुक्यातील जातेगाव, पाबळ, पठारवाडी व वडगावदर्या या गावातील ग्रामपंचायत निवडणूक केवळ एका जागेसाठी होणार आहे. तर डिकसळ येथे दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गावांतील इतर सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता त्याचा परिणाम या गावांना 25 लाख रूपयांचा निधी मिळणार नसल्याने त्यांची 25 लाखाची लॉटरी हुकली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!